नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा जागतिक मंचावर फाडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवणार आहे. त्यापैकी, तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळास परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती दिली. संयुक्त जनता दलाचे संजय झा, शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे, द्रमुकच्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसतर्फे खासदार अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरला जाणार आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली होती.
Fans
Followers